Telangana Rashtra Samithi TRS esakal
महाराष्ट्र बातम्या

KCR : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातून क्रांती सुरू करणार; के. चंद्रशेखर राव यांचं विधान

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : निवडणुकीत कोण पक्ष जिंकला हे महत्वाचे नाही तर निवडणुकीत जनतेचा विजय झाला पाहिजे. तेलंगणातील जनतेच्या अपेक्षा विचारात घेऊनच भारत राष्ट्र समितीचे कार्य सुरू झाले आहे. महाराष्ट्रातून सुरूवात केली असून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातून क्रांती सुरू झाली आहे, असे प्रतिपादन बीआरएसचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी केले.

महाराष्ट्राला नेतृत्व करण्यासाठी संधी मिळाली आहे. कर्नाटकमध्ये भाजप हरली आणि काँग्रेस जिंकली. जनता जिंकली पाहिजे. देशात तेलंगणा मॉडेल जाणार आहे. पाण्याचे नियोजन नाही त्यामुळे पाणी समुद्रात वाहून जात आहे. एकही पक्ष स्थिती बदलणार नाही. शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच राहणार आहे.

शेतकरी पदयात्रा काढत आहेत. तेलंगणामधील शेतकऱ्यांवर ही वेळ आली नाही. तेलंगणा मॉडेल देशात गेले आहे. राजकीय पक्षाची इच्छा शक्ती नाही. महाराष्ट्रातील ४५ हजार गावात जाणआर. महाराष्ट्रातून सत्ता परिवर्तन होईल. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातून क्रांती सुरू करू. २२ मे ते ता. २२ जून पर्यंत प्रत्येक गावात जाणार. ज्यांना काम करायचे नाही त्यांनी काम सोडून द्यावे.

प्रत्येक गावात नऊ समित्या बनवा. प्रत्येक मतदारसंघात टॅब दिला जाईल. प्रत्येक गावात पाच हजार रुमाल, झेंडे, तीन हजार टोप्या देण्यात येणार आहे. शिवाय पदाधिकारी नियुक्त केले जातील. त्यांना चांगले प्रशिक्षण देण्यात येईल. नागपूर, औरंगाबाद येथे घर खरेदी करणार असून मुंबईत ऑफिस, कार्यकर्त्यांना निवास, भोजन व्यवस्था उपलब्ध करून देणार असल्याचंही केसीआर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT