political esakal
महाराष्ट्र बातम्या

सरकारनं समजूतदारपणा दाखवला - राजू शेट्टी

सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं

सकाळ डिजिटल टीम

सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं

कोल्हापूर - देशाच्या संसदेत तुम्हाला बहुमतं असलं तरीही आम्हाला कृषी कायदा मान्य नाही, शेतकऱ्यांच्या या भूमिकेचा विजय झाला आहे. हा एक ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिली आहे. आज कृषी कायदे मागे घेणार असल्याचे मोदींनी जाहीर केलं आहे. या निर्णयावर राज्यभरातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

यासंबंधित राजू शेट्टी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, येत्या २५ तारखेला शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत होतं. जवळपास वर्षभर चालू असणाऱ्या हे आंदोलन शेतकऱ्यांनी शांतता आणि सत्याग्रहाच्या मार्गाने सुरू केलं. देशाच्या संसदेत तुम्हाला बहुमतं असलं तरीसुद्धा आम्हाला हा कायदा मान्य नाही, या भूमिकेमुळे हा निर्णय मागे घेतला आहे. आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे.

पुढे ते म्हणाले, मी सरकारचं अभिनंदन करतो. उशिरा का होईना त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांची इच्छा आणि मागणी याचा विचार केला. कारण आंदोलन म्हणजे युद्ध नाही. परंतु एक सत्याची मागणी सत्याग्रहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मांडली आणि त्याला यश मिळालं आहे. उशिरा का होईना सरकारने समजूतदारपणा दाखवला त्याबद्दल मी पंतप्रधान आणि केंद्र सरकारचं अभिनंदन करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT