Shrirang barge sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील भाजप नेते ‘लखीमपूर’वर गप्प का?काँग्रेस सचिव बरगे यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत (Farmers problem) कळवळा दाखवण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये (BJP leaders) चढाओढ सुरू असते; मात्र राज्यातील भाजप नेते लखीमपूर हत्याकांडावर (lakhimpur incident) गप्प का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे (shrirang barge) यांनी विचारला आहे.

भारताची ओळख कृषिप्रधान देश म्हणून आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच भारतीय संस्कृती समृद्ध करण्यात शेतकऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती; परंतु ११ महिन्यांपासून केंद्र सरकारने केलेल्या तीन काळ्या कायद्यांमुळे शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत असताना पंतप्रधानांना शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही.

लखीमपूर घटनेत मुख्य आरोपी केंद्रीय राज्यमंत्र्याचा मुलगा याला अटक होत नाही? लखीमपूर येथील घटनेने देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, अमानुष आणि लज्जास्पद कृत्य भारताच्या सुसंस्कृत परंपरेला डाग आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांची अटक दुर्दैवी असून, या संपूर्ण घटनेमधील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT