Ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Budget 2023 : कोणाच्या सरकारमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; अजित पवारांनी सांगितली आकडेवारी

दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पेटताना दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा मांडला आहे. तसंच कोणाच्या सरकारच्या काळामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याविषयी माहिती दिली आहे.

अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले, "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ पर्यंत पाच वर्षात ५०६१, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०१९ ते २०२१ या अडीच वर्षात १६६० तर एकनाथ शिंदे आल्यापासून फक्त सात महिन्यांमध्ये १०२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मला तुलना करायची नाही. पण कोणत्याही सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या होणे वाईट आहे."

ठोस मार्ग काढणं गरजेचं आहे, असं सांगताना अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ही आकडेवारी अगदी बोलकी आहे. दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहे. बीडमध्ये २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी मी भाषण ऐकायचो की ३०२ चा गुन्हा दाखल करा. मात्र ३०२ चा गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर मार्ग काढला पाहिजे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT