Mantralaya sakal media
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवारीमुळं राज्य मंत्रीमंडळात फेरबदल ?

नरेश शेंडे

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (MVA Government) सरकार मध्ये महत्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये (Congress) गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा दिला जात आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सांभाळणारे विभानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोलेंचे (Nata Patole) पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे सुरु आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यानंतर मविआच्या नेते मंडळींकडून आघाडी सरकार (Maharashtra Government) मध्ये कोणतीच बिघाडी नाहीये, अशा प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आल्या. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या दिल्लीवारीच्या (Delhi) चर्चांणा उधाण आलं आहे. त्यामुळं आघाडी सरकारमध्ये अंतर्गत धूसफूस सुरुच आहे की काय ? अशा चर्चांना तोंड फुटले आहे. (Maharashtra Congress Leader Delhi visits may change Maharashtra Government ministery-nss91)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी राज्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या रणनितीबाबत खलबतं झाली. त्यानंतर याबाबतचा संपूर्ण तपशील काँग्रेस हायकमांडकडे सोपवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीला बोलवले जात आहे. मागच्या आठवड्यात काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अचानक दिल्लीला बोलावलं होतं. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊतही दिल्लीत जावून आले. तर सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दिल्लीत होते.

तसंच दोन- तीन दिवसांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीवारीमुळे राज्य मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस मविआ सरकारमध्ये त्यांच्या दोन मंत्र्यांना बदलणार असल्याच्यं बोललं जात आहे. त्यातच नाना पटोले यांन मंत्रीपद मिळण्याच्या चर्चाही आहेत. तसंच विधानसभा अध्यक्ष पदासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा

राज्य मंत्रीमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही तयारी सुरु आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानं दोन्ही पक्षामध्ये मंत्रीपद रिक्त आहे. राज्य मंत्रीमंडळामध्ये काँग्रेसचे दहा कॅबिनेट मंत्री तर दोन राज्यमंत्री आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये स्वगृही परतलेले माजी मंत्री सुनिल देशमुख यांनाही महत्वाचं पद दिलं जाण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे १६, शिवसेना १४ तर काँग्रेसकडे १२ कॅबिनेट मंत्रीपद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT