Missing Girls From Maharashtra
Missing Girls From Maharashtra esakal
महाराष्ट्र

Love Jihad: प्रेमाच्या जाळ्यात अडकून बेपत्ता झालेल्या तरुणींसाठी सरकारचं पाऊल; दिले 'हे' निर्देश

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा खून प्रकरणानंतर राज्य सरकारनेदेखील पावलं उचलली आहेत. प्रेमाच्या जाळ्यात अडकून आणि लव्ह जिहादमुळे बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्देश दिले आहेत.

Missing Girls From Maharashtra

श्रद्धा खून प्रकरणाने देशाला हादरवून सोडलं आहे. या प्रकारानंतर लव्ह जिहादचीही चर्चा रंगत आहे. त्यातच आज राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिला आयोगाला निर्देश दिलेले आहेत. प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या बेपत्ता मुलींचा शोध या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

हेही वाचाः महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं की, दिल्लीच्या घटनेने देश हादरुन गेला आहे. ती मुलगी आपल्या महाराष्ट्राची होती. प्रेमाच्या जाळ्यात अडकून मुलींचे लग्न होतात. मात्र पुढे त्यांचं काय सुरुय ते पाहिलं जात नाही. दिल्लीतील मुलगी सहा महिने बेपत्ता होती. त्यामुळे अशा बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्याची गरज आहे. महिला आयोगाला अशा मुलींचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत, त्यासाठी पथक स्थापन करण्यास सांगितल्याची माहिती लोढांनी दिली.

परिवारापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार पावलं उचलीत आहे. लव्ह जिहादमुळे मुली बेपत्ता होत असल्याच्या चर्चा नेहमी होतात. त्याच अनुषंगाने राज्य सरकार विचार करत असल्याचं दिसून येतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT