Rajesh Tope  
महाराष्ट्र बातम्या

२५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता येणार; 'हे' ११ जिल्हे मात्र कडक निर्बंधातच

विनायक होगाडे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक आज पार पडली. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊनच्या शिथिलीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने चर्चा करुन काही बाबींची शिफारस मुख्यमंत्र्याना केली आहे. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन-तीन दिवसांत घेतील.

काय आहेत शिफारसी?

पॉझीटीव्हीटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियमांत शिथिलता आणली जाणार आहे. यानुसार, २५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

कसे असतील शिथिल केलेले निर्बंध?

  • दुकानं, हॉटेल्स, मंदिरे, जीम्स सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा

  • दुकाने शनिवारी सुद्धा चार वाजेपर्यंत चालू राहतील, रविवारी फक्त बंद राहिल

  • शॉप्स, हॉटेल्स, सिनेमा ५० टक्के क्षमतेने सुरु, याठिकाणी दोन डोस पूर्ण झालेले कर्मचारी हवेत

  • लग्न समारंभाबाबतच्या निर्णयातही थोडीफार शिथिलता येईल.

लोकलबाबतचा निर्णय

लोकल सुरु करण्याची मागणी होत आहे. दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरु करायची का याबाबत रेल्वे अथॉरिटीशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.

हे ११ जिल्हे तिसऱ्या गटातच राहणार

पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, अहमदनगर या जिल्ह्यात शिथिलता आणली जाणार नाही. या ठिकाणचे निर्बंध शिथिल होणार नाहीत. परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनाच्या सहकाऱ्याच्या मदतीतून आणखी कडक होतील. उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Folk Artist Death : लोककलेचा बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन; औरंगजेबाची 'ती' भूमिका ठरली होती अजरामर

'त्या' व्हायरल MMS नंतर शाहिद-करिनामध्ये आला होता दुरावा, पार्टीतील किसिंगमुळे...

Konkan Railway: २८ कोकण रेल्वे बंद, रत्नागिरी-दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करा, कोकणवासीयांचा आक्रमक पवित्रा

"दुनियादारीनंतर पुन्हा काम मिळालं नाही" मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत; "काळ्या रंगामुळे डावललं.."

BJP Foundation Day : मोठे मोठे पेच सोडवले, भाजपचे आता दोनच मुद्दे; PM मोदींनी स्थापना दिनी सांगितली पुढची वाटचाल

SCROLL FOR NEXT