पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन येथे धनगर समाजाचे वतीने चक्काजाम आंदोलन
दिपक बोऱ्हाडे यांच्या वतीने सुरु असलेल्या आरक्षण उपोषणाला पाठिंबा, शासनाने दखल घेतली पाहिजे याकरिता आज बिडकीन येथील पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धनगर एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करिता चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
सरकारच्या वतीने वारंवार धनगर समाजाला डावलले जात आहे.
राजू शेट्टी म्हणाले, पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केला आहे
यावर्षी उसाचे उत्पादन 10 ते 12 टनाने घटलेला आहे हे सरकारला माहिती आहे
महापुरामध्ये आणि अतिवृष्टी मध्ये उसाचे देखील नुकसान झालेले आहे असं असताना टनाला पंधरा रुपयांचा दरोडा ऊस उत्पादकांवर पडतोय
जिथे ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफ आर पी मिळू नये म्हणून राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जातं तेच राज्य सरकार पूर बाधितांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर जर टनाला पंधरा रुपयांचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला मान्य नाही
यामध्ये टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत
सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही सरकार हे कारखाना धार्जिन झालेला आहे
पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार प्रकरणी पोलिस कारवाई करत असतानाच आता आणखी एक प्रताप याच भागातून समोर आला आहे.
कोथरूड परिसरात असणाऱ्या एका इमारतीत २ गुंड थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
विशेष म्हणजे कुठलाही धाक न बाळगता या गुंडांनी चक्क सी सी टिव्ही मध्ये पिस्तूल आणि हत्यार दाखवत दहशत माजवली.
नेमकं कुठल्या उद्देशाने हे दोन गुंड या सोसायटी मध्ये शिरले होते याचा तपास सुरू आहे.
या गुंडांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची पोलिसांकडे मागणी करण्यात आली...
धनगर समाज आरक्षणाच्या मुद्दावरून आक्रमक, अंबड - पाचोड रस्त्यावरती शिरनेर गावाजवळ रस्ता रोको
रस्त्यावरती टायर पेटवत केला सरकारचा निषेध...
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झालाय..
जालन्यामध्ये धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पंधरावा दिवस आहे..
दिपक बोऱ्हाडे यांनी राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा आवाहन धनगर समाजाला केलं होतं...
यानंतर जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे...
राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, एक ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात पीक पाहणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्याने 100 टक्के पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी,असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
खरीप हंगाम 2025 साठी ही पीक पाणी महत्त्वाची.
५ ऑक्टोबर रोजी अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर
लोणी आणि कोपरगाव येथील विविध कार्यक्रमांना हजेरी...
प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे शहा यांच्या हस्ते लोकार्पण...
यासह शहा यांच्या हस्ते लोणी येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण...
लोणी बाजारातळ येथे आयोजित सभेस अमित शहा करणार मार्गदर्शन...
रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापदी पदासाठी आरक्षण जाहिर
मंडणगड संगमेश्वर लांजा पंचायत समिती सभापतीसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण
रत्नागिरी चिपळूण गुहागर आणि खेड पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण (ओपन) गटासाठी आरक्षण
दापोली पंचायत समिती सभापती साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर राजापूर पंचायत समिती सभापती साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षण
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात निघाली आरक्षण सोडत
रत्नागिरी जिल्ह्यात ९ पंचायत समित्या, सभापती पदाच्या आरक्षण सोडती नंतर सर्व राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती पिकांबरोबर, फळबागांना देखील मोठा फटका बसलाय. विशेषता नदीकाठची फळबाग पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. लातूरच्या कासारखेडा शिवारात मांजरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन एकर भाग पाण्यात होती. मात्र पूर ओसरला आणि आता जागेवरच पेरून साडीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच प्रचंड मोठ नुकसान झालं आहे.
सततच्या पावसाने जवळपास सर्वच पिकांचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परवडत नाही. शेगाव तालुक्यातील लासुरा येथील शेतकरी आनंद जवंजाळ यांनी आपल्या दोन एकर शेतात उडीद पिकाचे उत्पन्न घेण्याचं ठरवलं होतं पीकही चांगल आलं होतं. मात्र हातात तोंडाशी आलेल्या उडीद पिकाला सततच्या पावसाने मोठा फटका बसला व त्यामुळे उत्पादन खर्च परवडत नसल्याने आनंद जवंजाळ यांनी दोन एकर शेतातील उडीद पिकाच्या सुडीला स्वतःच आग लावून पेटवून दिलं.
राज्यात एक ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात १०० पीक पाहणी होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्याने 100 टक्के पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी,असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश खरीप हंगाम 2025 साठी ही पीक पाणी महत्त्वाची.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.