Subhash Desai
Subhash Desai 
महाराष्ट्र

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे: सुभाष देसाई

सकाळवृत्तसेवा

मुंबई - आम्ही कॅबिनेट बैठकीत जाणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. शेतकरयांना अंधारात ठेऊन निर्णय घेऊ नये, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज (बुधवार) होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार घातला. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे सरकारमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून, शिवसेना सत्तेत राहणार की बाहेर पडणार या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सुभाष देसाई म्हणाले, की कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यासाठी आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या बाहेर आहोत. शेतकऱ्यांना रस्त्यावर का उतरावा लागले याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. कर्जमाफीचा तपशील ठरविताना शिवसेनेला घ्यावेच लागेल. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेशिवाय तो मान्य होणार नाही. शेतकरयांना अंधारात ठेऊन निर्णय घेऊ नये. कोणीही शिवसेनेला दमबाजी करू नये. ती आम्ही खपूवन घेणार नाही. आम्ही डगमगत नाही. सरसकट कर्जमाफी व्हावी ही आमची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT