Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sakal
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्यपाल कोश्यारींना हटवावं का? आदित्य ठाकरेंच्या पोलने दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कोश्यारी यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. त्यांच्या विरोधात निषेध करत आंदोलनंही केली जातात आहेत. तसंच राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून राज्यपाल पदावरुन हटवा, अशी मागणी करणाऱी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. अशातच आदित्य ठाकरे यांच्या पोलमधूनही अशी मागणी होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर एक पोल घेतला. त्याचा निकाल आता समोर आला आहे. या निकालातूनही राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी समोर येत आहे. महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी पदमुक्त केले पाहिजे का?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी ट्वीटर पोलमध्ये विचारला आहे. त्याखाली त्यांनी होय, उशीर झाला आहे, नाही, मी महाराष्ट्र द्वेषी असे तीन पर्याय दिले आहेत.

या तीनपैकी सर्वाधिक मते होय अशी आली आहे. जवळपास 79.5 टक्के नागरिकांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे. तर १३.४ टक्के लोकांना असं वाटत आहे की आता या गोष्टीला उशीर झाला आहे. ७.१ टक्के नागरिकांनी मात्र राज्यपालांना हटवण्याच्या या मागणीला नकार दिला आहे.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

काय होतं राज्यपाल कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य?

"तुमचा आदर्श कोण आहे, असं पूर्वी विचारलं जायचं तेव्हा जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी अशी उत्तरं दिली जात होती. पण महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही. इथं खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नितीन गडकरी नव्या काळातले आदर्श आहेत".

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT