Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, आता राष्ट्रवादीने ठोकला दावा

Sandip Kapde

Maharashtra Politics: महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून चर्चेचा विषय असलेल्या 12 राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी उठवली. त्यामुळे आता पुन्हा 12 आमदारांच्या नावावरुन चर्चा होणार आहे. अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावर भाष्य केले आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीत राष्ट्रवादीने देखील दावा सांगितला. 12 विधान परिषद आमदारांच्या यादीत आमचीही हिस्सेदारी असणार. इथून पुढे ज्या-ज्या गोष्टी घडतील त्यावर आमचा अधिकार असणार, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र राज्यपालांनी या यादीला हिरवा कंदील दिला नाही किंवा यादीच्या मंजुरीबाबत भाष्य केले नाही.

याप्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल करूनही राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊनही 12 आमदारांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना आव्हान दिले होते. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने दिलेली 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यानंतर शिंदे सरकारच्या वतीने नवीन यादी देण्याची तयारी सुरू झाली. या 12 नावांबाबत दोन्ही बाजूंकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला 12 पैकी 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र आता अजित पवार गटाने देखील यात वाटा मागितला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT