Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: अन् राजकीय गोंधळात राणेंनी ठाकरेंना दिलं मासे खाण्याचं आमंत्रण

ठाकरे हे आमंत्रण स्विकारतील का?

धनश्री ओतारी

उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. एकेकाळी शिवसेनेत शब्दाला वजन असलेले राणे बाहेर का पडले, उद्धव आणि राणे यांच्यात नेमका काय वाद झाला याबाबत अजूनही उत्सुकता आहे. अशातच राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेलाय. अशातच, नारायण राणे यांनी ठाकरेंना मासे खाण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे ठाकरे हे आमंत्रण स्विकारतात का ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Maharashtra Politics Narayan Rane Thackeray invitation to eat fish)

झी मराठी वाहिनीवरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी झाले होते. गुप्तेंच्या शोमध्ये जादूचा फोन हा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या फोनवरुन पाहुणे स्थळ-काळाच्या बंधनाविना अगदी कोणालाही फोन करु शकतात.

हीच संधी साधत नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंना फोन केला. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवाद साधताना मासे खाण्याचं आमंत्रण दिले.

नेमकं काय म्हणाले राणे?

जय महाराष्ट्र उद्धव साहेब, नारायण राणे बोलतोय. तब्येत कशी आहे? बरी आहे ना? कोकणात येऊन तुम्ही रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध केलात. पण तुम्हाला माहित असेल, तर शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणी माणसाची साथ लाभली आहे. कोकणातून आलेल्या माणसांनी शिवसेना वाढवली, किंबहुना आजही वाढवत आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

बारसू रिफायनरी प्रकल्प कोकणच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध नको, सहकार्य करा. तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहात. कोकणाने बाळासाहेबांना प्रेम आणि विश्वास दिला. तुम्ही त्यापैकी एक तरी द्या. कोकणात मासे खायला या, पण विरोध करायला नको, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT