Sharad Pawar
Sharad Pawar 
महाराष्ट्र

शरद पवारांकडून 32 वर्षांनंतर मोर्चाचे नेतृत्व

प्रशांत बारसिंग

नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज काढण्यात येणाऱ्या ‘हल्लाबोल’ ‘जनआक्रोश’ मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रिय मंत्री गुलाम नबी आझाद करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

तब्बल 32 वर्षांनंतर शरद पवार हे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. 1985 साली शरद पवार यांनी जळगाव ते नागपूर अशी सायकल रॅली काढत कॉग्रेस सरकारच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर आता भाजपा सरकारच्या विरोधात पवार रस्त्यावर उतरत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 77 वा वाढदिवस आहे मात्र ते वाढदिवसा दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारच्या विरोधात. रस्त्यावर उतरणार आहेत.आज नागपूर मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून “हल्लाबोल” आणि “जन आक्रोश” मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार आणि माजी केंद्रिय मंत्री गुलाम नबी आझाद करणार आहेत. त्यामुळे तब्बव ३२ वर्षांनंतर शरद पवार हे पुन्हा एकदा सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.  या मोर्चामध्ये शेकाप, समाजवादी पक्ष, पीआरपी (कवाडे ) देखील सहभागी होणार आहे. शरद पवार आपला वाढदिवस दरवर्षी त्यांच्या राहत्या घरी साजरा करतात. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र या असवेदनशील सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या मोर्चाद्वारे विधान भावनावर धडकणार आहोत. आजच्या मोर्चात सुमारे 2 लाख कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT