Hasan Mushrif vs Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

'राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाडांना कोणी विचारत नाही, ते एकाकी पडलेत'; एकेरी भाषेत उल्लेख करत मुश्रीफांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना कोणीही विचारत नाही.

सकाळ डिजिटल टीम

‘मुश्रीफ यांना भाजपसोबत जायचे नव्हते, तसा फोन त्यांनी मला केला होता’, असा दावा आव्हाड यांनी काल केला होता.

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना कोणीही विचारत नाही. ते एकाकी पडल्याने काहीही बोलत आहेत, त्यांची बुद्धी ठिकाणावर नाही’, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला. आव्हाड यांच्यावर एकेरी शब्दात टीका करून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘मुश्रीफ यांना भाजपसोबत जायचे नव्हते, तसा फोन त्यांनी मला केला होता’, असा दावा आव्हाड यांनी काल केला होता. यावर मुश्रीफ यांची प्रतिक्रिया विचारल्यावर ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले,‘आव्हाड यांना पक्षात कोणी विचारत नाही. त्यामुळे ते एकाकी पडले आहेत. पहिल्यांदा आमची सत्ता गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी व शिंदे गटासोबत आपण जावे यासाठी आव्हाड यांनीच पुढाकार घेतला होता. त्यावेळी आमदारांनी सह्या केल्या त्यावर आव्हाड यांची सही एक नंबरला आहे. पण आता आम्ही भाजपसोबत जायचे ठरवले, त्यावेळच्या चर्चेत आव्हाड नव्हतेच. माझा भाजपसोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रीपदाची शपथ घेतली असती का?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT