Nitesh Rane Letter to CM Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर.., MLA राणेंचं CM ठाकरेंना पत्र

या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना वाद उफाळू आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना वाद उफाळू आला आहे.

सध्या राज्याच होऊ घातलेल्या विविध निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. सध्या देशपातळीवरील राष्ट्रपती निवडणूक आणि विधान परिषदेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभेनंतर अनेक नाट्यमय राजकीय घडोमोडी या निवडणुकीतही घडतील असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना वाद उफाळू आला आहे. (Nitesh Rane Letter to CM Uddhav Thackeray)

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत टीकेची झोड उठवली आहे. सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. अगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु असून आता आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आठ दिवसांपूर्वी वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळलं या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणेंनी काय म्हटलंय पत्रात?

सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो. गुन्हेगारीचं साम्राज्य, भ्रष्टाचाराची दलल वाढून सामान्य मुंबईकरांच्या उंबऱ्यापर्यंत पोहचली आहे. तुम्हीही मुंबईचे रहिवाशी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एक दिवस ओलांडणारच होती. आता तस झालं आहे. गुरुवारी ९ जूनला तुमच्या निवास्थानाहून हकेच्या अंतरावर असलेलं वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळलं आहे. १७ जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. ४० वर्षीय युवकाचा बळी केला. त्या कटुंबांनी फोडलेल्या टाहोने संबंध मुंबईचं काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथं भेट देऊन विचारपुस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगले आहेत.

सत्तेची लालसा, अधिक मतांची लालसा जिवघेणी ठरते आहे. मुंबईबाहेरील लोकांनाच्या मतांच्या लोभात अनाधिकृत बांधकामांना तुमचे नगरसेवक परवानी देतात. मुबईत १४ फुटाच्यावर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहर नजर असल्यानं ही बांधकामं राजरोज सुरु आहेत. अनाधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळं जेवाशी खेळ करत तिथं दोन दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. वारंवार अनाधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा जीव बळी जातोय. आपण मात्र शांतेत हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. यामुळं निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्याची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Coast Guard Operation Video: तटरक्षक दलाची मोठी कारवाई! अरबी समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या नऊ पाकिस्तानीना पकडलं!

Indian Evacuation from Iran : इराणमधील संकटात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने सज्ज; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

SCROLL FOR NEXT