Uddhav Thackeray
Uddhav Thackeray 
महाराष्ट्र

मनसे नेते म्हणतात, उद्धवा अजब तुझे सरकार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिस दलात अश्वांचा समावेश करण्यात आल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हटले आहे.

मुंबईत गुरुवारी (ता. 23) मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मनसे नव्या रुपाने समोर येणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यापूर्वीच मनसे नेते राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलिस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं... उद्धवा अजब तुझे सरकार. त्यांनी यापूर्वीही सरकारच्या निर्णयावर टीका केलेली आहे. तसेच अधिवेशनानिमित्त मंत्रालयातील गोड गोड अळूच फदफद आवडत की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा..., असे ट्विट त्यांनी अधिवेशनापूर्वी केलेले आहे. त्यामुळे आता मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT