महाराष्ट्र

'बर्ड फ्लू'चा कहर सुरूच, 7 लाख कोंबड्या केल्या नष्ट; मात्र गैरसमजुतींपासून दूर राहा 

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 14 : राज्यात 'बर्ड फ्लू'चा कहर अद्याप सुरूच आहे. जळगाव,अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात हा संसर्ग पसरला आहे. खबरदारी म्हणून आतापर्यंत 7 लाख 12 हजार 172 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.  

राज्यात काल  कुक्कुट पक्षामध्ये जळगांव 19, अमरावती 50 आणि बुलडाणा येथे 65 अशी कुक्कुट पक्षांमध्ये एकूण134 इतकी मृत झाली. बगळे पोपट, चिमण्या अशा अन्य इतर एका पक्षाची आकस्मिक मृत्यूची राज्यात नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये राज्यात 16 कावळे मृत आढळून आले आहेत. राज्यात शनिवारी एकूण 151 पक्षामध्ये मरतुक झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 7 लाख 12 हजार 172 कुक्कुट पक्षी, 19 लाख 68 हजार 181 अंडी व 72 हजार 974 किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बर्ड फ्लू रोग प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी नष्ट करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या मालकांना आजतागायत रू. 45.40 लक्ष अनुदान वाटप करण्यात आले आहे.

अफवा आणि गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन पशु संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. कुक्कुट पक्षांचे मांस व अंडी हा प्रधिनाचा स्वस्त असणारा स्तोत आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

mumbai news amid bird flu seven lac chicken birds disposed but stay away from rumors


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT