Police Recruitment
Police Recruitment esakal
महाराष्ट्र

Mumbai : पोलीस भरती चाचणीनंतर अंघोळ करताना झाली उलटी अन्...; आठवडाभरात मृत्यूची दुसरी घटना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागलेल्या तरूणाचा हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस भरतीसाठी मुंबईत आलेल्या उमेदवाराच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमर अशोक सोलके(२४) असे मृत तरूणाचे नाव असून तो अमरावती येथील नवसारीतील रहिवासी आहे. तो पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मुंबईत आला होता. तो सध्या फोर्ट परिसरातली रेसिडन्सी हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. सोलकेने मंगळवारी मैदानी चाचणी दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने परिचीत व्यक्तीला सांगितले होते.

त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास सोलके हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना त्याला उलटी झाली व तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लागोपाठ दुसरा मृत्यू

या आठवड्यात भरती प्रक्रिये दरम्यान घडलेली दुसरी घटना आहे. या पूर्वी मुंबई पोलीस दलातील भरतीची प्रक्रिये दरम्यान सांताक्रुझच्या कलिना येथील कोळे कल्याण मैदानात एका उमेदवाराचा 17 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मैदानी चाचणीदरम्यान चक्कर आल्याने हा तरुण कोसळला. गणेश उगले असे या तरूणाचे नाव असून 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली असता तो खाली कोसळला. यानंतर गणेश उगलेला सांताक्रूझ येथील व्हीएन देसाई रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत गणेश उगले 27 वर्षाचा असून मूळचा वाशिमचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT