नगरः एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली होती. या घटनेनेने राज्यभरात खळबळ उडालेली. याप्रकरणी आता आत्महत्येचं कारण समोर आलेलं आहे.(7 Dead Bodies Found In Bhima River)
नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यामध्ये १७ जानेवारी रोजी एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली होती. भीमा नदीपात्रात उडी मारुन सात जणांनी आयुष्य संपवलं होतं.
या आत्महत्येचं कारण प्रेमकरण असल्याचं आता समोर आलेलं आहे. मुलाने मुलगी पळवून नेली म्हणून मुलाच्या वडिलांसह घरच्यांनी आत्महत्या केली.
हेही वाचाः ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी
मुलाने मुलगी पळवून नेल्याचं शल्य वडिलांच्या मनामध्ये होतं. ते वारंवार मुलीला परत आण म्हणून सांगत होतं. मात्र मुला ऐकत नव्हता.
शेवटी वडिलांनी दुसऱ्या मुलाला फोन करुन निर्वानिचा इशारा दिला होता. एक तर मुलगी परत आणायला सांग नाहीतर आम्ही विष घेतो किंवा पाण्यात जीव देतो, असं ते म्हणालेले.
तरीही मुलाने ऐकलं नव्हतं. त्यामुळे १७ जानेवारी रोजी भीमा नदीपात्रात मुलाचे आई, वडील, बहीण, जावई, बहिणीचे तीन मुलं यांनी आत्महत्या केली.
नगरच्या पारनेर तालुक्यात ही घटना घडली होती. आज या सात जणांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.