महाराष्ट्र

'ओबीसी शिष्यवृत्तीचे ९०० कोटी थकवले'

सकाळवृत्तसेवा

नागपूर - ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र शासनातर्फे दिली जात असलेली मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती भाजपची सत्ता आल्यापासून बंद केल्याचा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी शुक्रवारी केला. शिष्यवृत्तीचे दोन वर्षांचे तब्बल ९०० कोटी रुपये थकीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार शिष्यवृत्तीची थकीत रक्कम देत नसल्यास त्याची पूर्तता राज्यसरकारने करावी व ई-शिष्यवृत्तीचे तांत्रिक कारणाने अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेलेले नाहीत. त्याची मुदत वाढवावी, अशी मागणी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे गजभिये यांनी केली. 

सरकारने ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी यांची वार्षिक मर्यादा ४४ हजार ५०० वरून एक लाख रुपये केल्याने केंद्रातील भाजप सरकारने ओबीसींसाठी होणारा वार्षिक वाढीचा खर्च राज्य शासनाने करावा असे कळविले आहे. त्यामुळे इतर  मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अनुदान प्राप्त झाले नाही. भाजप सरकारने शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज अनिवार्य केले. सरकारने ई-शिष्यवृत्तीच्या कामासाठी पुणे येथील मास्कटेक  कंपनीसोबत ३० एप्रिल २०१६ रोजी करार केला. मात्र, सॉफ्टवेअरमध्ये असंख्य त्रुटी असल्याने २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षांत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. पुन्हा नव्याने २०१७-२०१८ या वर्षासाठी ई-शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी ‘महाडीबीटी’अंतर्गत नागपूर येथील इन्व्होलेव मेसर्स कंपनीला कंत्राट सोपविले. ती कंपनीही अयशस्वी ठरली. ई-शिष्यवृत्तीसाठी इतर  मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेले नाहीत. याला भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोपही गजभिये यांनी सभागृहात केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT