nana patole sakal media
महाराष्ट्र बातम्या

'काँग्रेसला बदनाम करण्यासाठी मित्रपक्षांनी सुपारी घेतलीय?' पटोलेंनी दिले स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : काँग्रेसला (Congress) बदनाम करण्यासाठी आमच्याच मित्रपक्षांनी सुपारी घेतल्याचे वक्तव्य नाना पटोलेंनी (Nana Patole) केल्याचे बोलले जात होते. त्यावरच आता पटोलेंनी स्पष्टीकरण दिले असून सुपारी हा शब्द वापरला नसल्याचे म्हटले आहे. 'मी मित्रापासून सावध राहा असं म्हटलं होतं. विदर्भात राष्ट्रवादीला फारसे महत्व नाही, हे विदर्भातील जनतेने वारंवर सांगितले आहे', असं पटोले म्हणाले.

पटोलेंच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये आणखी नवा वाद निर्माण होईल का? अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता स्वतः पटोलेंनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्यांनी अमरावती हिंसाचाराच्या घटनेवर देखील भाष्य केले आहे. जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश बिहारमध्ये निवडणुका येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याचं यांना सुचतं. इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा राज्यात घडलेली घटना पडसाद महाराष्ट्रात पडत आहे. हा भाजपचा जुना प्रयत्न आहे. मात्र, आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात येणार नाही, असंही पटोले म्हणाले.

भाजपचे महाराष्ट्रातून पहाटेचे सरकार गेले. त्यामुळे ते रात्री स्वप्न न बघता दिवसा स्वप्न बघतात. त्यामुळे महाराष्ट्रात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग त्यांना पटत नाही. त्यामुळे ते सरकार अस्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. हिंदू-मुस्लीम वादाचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील तर राज्यातील जनता त्याला भीक घालणार नाही, असंही पटोले म्हणाले. महाराष्ट्रात शांतता ठेवा. ज्या अफवा पसरवल्या जातात त्याला बळी पडू नये. भाजपच्या गळाला कोणी लागू नये, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.

आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन सुरू केलेल आहे देशामध्ये भुकमरी आहे ,शेतकरी आत्महत्या वाढल्या आहे देशाचा संविधान धोक्यात आला आहे या सगळ्या भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT