Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : आमच्या सरकारमध्ये फार तोरा दाखवणाऱ्यांचा आता आवाजच बंद; पटोलेंचा अजित पवारांना टोला

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत

रोहित कणसे

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य सध्या चांगलच चर्चेत आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असे फडणवीस म्हणाले. या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

फडणवीस काय म्हणाले...

राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय हालचालींना वेग आला आहे यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तारकांना मार्गदर्शन करताना, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असं वक्तव्य केलं होतं.

यावर नाना पटोले म्हणाले की, भाजप बॉस आहेच, मंत्रिमंडळाचे निर्णय फडणवीस हेच घेत आहेत. मुख्यमंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये फार तोरा दाखवणारे आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचा आता इकडे आवाजच बंद झाला. मग फडणवीस म्हणत आहेत त्यात असत्यता कुठं आहे? सत्यच आहे ते असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

राज्य सरकारच्या धोरणांवर यावेळी टीका करताना पटोले म्हणाले की, राज्यात दळभद्री सरकार आहे, वेगनाहिन सरकार आहे. या सरकारला कोण मेलं कोण वाचलं याच्याशी देणंघेणं नाही. कारण की हे सरकार गुजरातच्या दोन मानसांसाठी काम करतंय. सरकारला जनतेची काळजी नाही. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे. अजूनही सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. तरुणांमध्ये बरोजगारी आहे, असेही नाना पटोले म्हणाले. सरकार लायक राहिलं नाही, ही जनतेची भावना झाली आहे असेही नाना पटोले म्हणाले.

जागावाटपावर काँग्रेसची भूमिका काय?

मुंबईतील चार जागांसह शिर्डीतील जागेवर उद्धव ठाकरे गटाकडून दावा सांगितला जात आहे. यावर काँग्रेसची भूमिका काय? याविषयी बोलताना पटोले म्हणाले की, मेरिटप्रणाणे जागांचा निर्णय केला जाईल, भाजपला कुठल्याही परिस्थितीत, केंद्रात बसलेल्या हुकूमशाहाला सत्तेतून काढून देशातील लोकशाही वाचवणे ही काँग्रेसची भूमिका आहे. मेरिटच्या आधारावर निर्णय घेतला जाऊन ज्या ठिकाणी ज्या पक्षाच्या उमेदवाराचं मीरिट असेल त्याला तिकीट देण्याची काँग्रेसची भूमिका असेल असे नाना पटोले म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT