narendra joshi Apologize for uday samant death threat in nana patole meeting nanar refinery  
महाराष्ट्र बातम्या

सामंतांना जाळून टाकू म्हणणाऱ्या कार्यकर्त्याने मागितली माफी; म्हणे, आम्ही...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राजापूर येथील एका कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकू अशी धमकी दिल्याप्रकरणी रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशी यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितीली आहे. उदय सामंत यांना जाळून टाकू असं वक्तव्य त्यांनी राजपूर येथील सभेला संभोधित करताना कॉंग्रेस नेते नाना पटोले आणि पोलिसांसमोरच ही धमकी देण्यात आली होती.

दरम्यान तो धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली असून या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक्षक मोहनकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा करत पुढील चौकशीची ग्वाही दिली. त्यानंतर आता जोशी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत आता जोशी यांनी माफी मागितीली आहे.

उदय सामंत यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, आम्ही गुन्हेगार नाही आहोत, आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहचत नसून सरकार आमची दखल घेत नाहीये. आम्हाला हा प्रकल्प नकोय, असे जोशी यांनी म्हटले आहे. सरकारकडून जी दडपशाही चालली आहे त्या अनुशंघाने माझ्याकडून जे काही शब्द निघाले त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो असेही ते म्हणाले आहेत.

रिफायनरीचे विरोधक उदय सामंतांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातल्या जोशी या कार्यकर्त्याने उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT