Nashik Bus Accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Nashik Accident : बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते?

कंटेनरला धडक बसल्यानंतर या बसने पेट घेतला आणि १२ जणांचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे भीषण अपघात झाला. खासगी बस आणि कंटेनरची धडक झाल्यावर बसने पेट घेतला आणि यामध्ये होरपळून १२ मृत्यू झाले आहेत. आता या खासगी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ही बस चिंतामणी ट्रॅव्हल्स या कंपनीची होती. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते. त्याची चौकशी करून कारवाई होईल, असं जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं. राठोडांनी या प्रकरणी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या ऑफिसला भेट देत प्रवाशांबद्दलची माहिती घेतली आहे. शिवाय, सुरक्षा यंत्रणेबद्दलचीही माहिती घेतली आहे.

यंत्रणेचंही अपयश

पहाटे ४:३०- ५ च्या सुमारास अपघात झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी तातडीने 100, 112 या क्रमांकांवर संपर्क साधले. अँब्युलन्सला फोन केला, अग्निशमन दलाशीही संपर्क साधला. परंतु सहा वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीही पोहोचू शकले नाही. पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना शहर बसमधून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मृतांनाही याच बसमधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. बराच वेळाने 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. एकूणच या घटनेमध्ये आपत्कालीन व्यवस्था फोल ठरल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : मुळशीत आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीसोबत विक्रेत्याचं धक्कादायक कृत्य; गावकऱ्यांचा संताप!

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनी १८ मे रोजी निवृत्त होतोय? पाच वर्षांपूर्वी त्याने तसं म्हटलं होतं अन्...

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची मोठी अपडेट; जाणून घ्या २,००० रुपये कधी मिळणार?

Manoj Jarange Patil: राज्यातील भाजप सरकार उलथवून लावण्याची गरज: मनाेज जरांगे-पाटील, बंगालमध्ये गडबड केल्याचा संशय!

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी येत्या 15 दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

SCROLL FOR NEXT