Shalinitai Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

उद्या 'घट' बसतील; पण घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सव संपताच सर्वांनाच नवरात्रौत्सवाचे (Shardiya Navratri) वेध लागतात.

मुंबई : गणेशोत्सव संपताच सर्वांनाच नवरात्रौत्सवाचे (Shardiya Navratri) वेध लागतात. यंदा शारदीय नवरात्रौत्सव (Navratri Festival) नऊ ऐवजी 8 दिवसांचा असेल. तर, नवरात्रौत्सवाला उद्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. याच अनुषंगानं मनसेच्या शालिनीताई ठाकरे (MNS leader Shalinitai Thackeray) यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या, उद्यापासून 'घट' बसतील; पण गेली दीड वर्ष घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) केलाय.

पुढे शालिनीताई म्हणाल्या, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून सरकारकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. मुसळधार पावसाने अनेकांचे नुकसान केले असून अद्याप ओला दुष्काळ फंड जाहीर झाला नाही, सरकार करतंय काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शिवाय, राज्यात खड्डेमय रस्ते झाले असून यातून मार्ग काढाताना नाकी नऊ येत आहेत. यावरती भाष्य करताना त्यांनी हॅशटॅगही (#महिलाअत्याचार #ओलादुष्काळ #खड्डेमयरस्ते) वापरले आहेत.

दरम्यान, तृतीया आणि चतुर्थी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने नवरात्रौत्सव 8 दिवसांचा असेल. आश्विन शुद्ध प्रतिपदा यंदा उद्या 7 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात (Festival start) होते. यंदा विजयादशमी म्हणजेच दसरा (Dussehra) 15 ऑक्टोबर या दिवशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT