महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिकांनी शेअर केला वानखेडेंच्या ‘निकाह’चा फोटो; म्हणाले, 'त्यांच्या धर्माशी...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आतापर्यंत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सुरु झालेली आरोपांची मालिका अद्याप सुरुच आहे. याआधी वानखेडे यांच्या कारवांयावर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर वानखेडेंनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोपही केला. आता समीर वानखेडे यांनी हिंदु असल्याचा दावा करत असताना मलिकांनी नवा खुलासा केला. ट्विटरवर त्यांनी गूड मॉर्निंग म्हणत समीर वानखेडेंचा पहिला निकाह झाला होता असं म्हटलं आहे. त्यांच्या या निकाहचे प्रमाणपत्र आणि फोटो देखील त्यांनी ट्विटरवर जाहीर केला आहे.

नवाब मलिकांनी म्हटलंय की, मी हे स्पष्ट करु इच्छितो की, मी जो समीर वानखेडेंबाबत खुलासे करत आहे, ते धर्मासंबंधी नाहीयेत. ज्यापद्धतीने फसवणूकीच्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी प्राप्त करण्यासाठी एका मागासवर्गीय जातीच्या व्यक्तीवर अन्याय करुन खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळवली आहे.

सोबतच त्यांनी समीर वानखेडे यांच्या डॉ. शबाना कुरेशीसोबतच्या विवाहाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. तसेच त्या लग्नाचा 'निकाह नामा' देखील त्यांनी प्रसिद्द केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra local politics news : सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांची गावरान भाषेत खिल्ली उडवली, जिल्हा परिषद राजकारण तापलं

Bel Patra Benefits: महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्राचा असा करा वापर, सर्दी, खोकलासह हे 5 आजार राहतील दूर

Latest Marathi News Live Update : गुजरात उच्च न्यायालयाने आसाराम बापूची ४५,००० चौरस मीटर जमीन परत मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या कारवाईला मान्यता दिली

Jaykumar Gore:औंधसह २१ गावांना तीन वर्षांत पाणी देणार: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; यापुढची निवडणूक पाणीप्रश्नावर होणार नाही!

Mumbai–Pune Expressway: ३२ तास रस्ता बंद, लोक रस्त्यावर अडकले… राज ठाकरेंनी मागितला टोल परतावा; सरकारच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT