NCP Ajit Pawar On morning oath ceremony with devendra fadnvis and joining bjp maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीनंतर देखील उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हीच कसे? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आज (२१ एप्रील) सकाळ माध्यमास दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीदरम्यान पवारांनी पहाटेच्या शपतविधीनंतर देखील उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडेच कशी देण्यात आली यावर भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पार पडलेल्या पहाटेच्या त्या शपथविधीनंतर तुमच्याच पक्षामधून तुमच्या बद्दल नकारात्मकता दिसून येत होती. तरीसुध्दा उपमुख्यमंत्री म्हणून तुमचं नाव पुढे आलं आणि पुढे तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व देखील केलं. याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, पहाटे नाही, सकाळी आठला पहाट म्हणत नाहीत. पहाट म्हणजे चार, पाच, सहा इथपर्यंत..सात-आठला पहाट म्हणाल का? आठ वाजता सकाळ झालेली असते.

पुढे प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मी या घटनेकडे जशी घडली तसं बघतो. मी वेगळ्या पध्दतीने याकडे पाहात नाही. या गोष्टीला जवळपास साडेतीन वर्ष झाली आहेत. मी सुरूवातीपासून सांगतोय यावर मला कुठलंच वक्तव्य करायचं नाही. मला ते पद का मिळालं तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ५४ आमदार निवडून आले होते त्यापैकी बहुसंख्य आमदारांनी सांगितलं की तुम्ही अजितलाच उपमुख्यमंत्रीपद द्या. त्यामुळेच पक्षाने आणि वरिष्ठानी ते मला दिलं असं अजित पवार म्हणाले.

भाजपमध्ये जाण्याबाबत राष्ट्रवादीत दबावगट आहे का?

राष्ट्रवादीमध्ये असा कुठला कायम दबावगट आहे का ज्याचं भाजपसोबत गेलो तर आपण स्थिर सरकार देऊ शकतो असं म्हणणं आहे? या प्रश्नावर बोलताना अजित पवारांनी स्पष्ट केलं की, असा कुठलाही दबावगट राष्ट्रवादीमध्ये नाहीये, याबद्दल गैरसमज करण्याची गरज नाही.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, शेवटी काम करत असताना आपण सेक्युलर, पुरोगामी महाराष्ट्र अशा गोष्टी बोलत आलो, पण २०१९ ला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार स्थापन झालं तेव्हा या सगळ्या गोष्टींना फाटा देण्यात आला. कारण शिवसेनेने नेहमी हिंदूत्वाचा पुरस्कार केला आहे, पण नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाकरिता मतभेत होतील अशी मते पुढे आणायची नाहीत असं ठरवून काम केलं गेलं.

परंतू शेवटची कॅबिनेट झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं की औरंगाबादला संभाजीनंगर आणि उस्मानाबादला धाराशीव नाव द्यायचं आहे. तेव्हा सर्व पक्षांची वेगवेगळी भूमिका होती. सगळ्यांनी समंजसपणा दाखवला आणि ठराव मान्य करण्यात आला. त्यानंतर सरकार गडगडलं असं अजित पवार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT