Jayant Patil 
महाराष्ट्र बातम्या

जयंत पाटील म्हणतात, दोन दिवसांत सगळं सुरळीत होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप काही ठरलेली नाही. मात्र, शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांत पूर्ण होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकारचा शपथविधी पार पडून आठवडा उलटला असला तरी अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर अद्याप एकाही मंत्र्याला खातेवाटप झालेले नाही. हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये  होत आहे. त्यापूर्वी हे खातेवाटप होण्याची शक्यता आहे. यावर जयंत पाटील यांनीही शिक्कामोर्तब केले आहे.

सर्वकाही दोन दिवसांत सुरळीत पार पडेल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून काही माहिती नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच माहिती देवू शकतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime: प्रेमाच्या आड आलेला पती ठार! कोरपना तालुक्यात धक्कादायक हत्या

Dombivli Kalyan Politics:'डोंबिवली कल्याणचा राजकीय पट बदलतोय'; वैर संपतंय, हितगुज वाढतेय; नवी समीकरण जुळतायत..

Latest Marathi Breaking News : बीडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राडा...

अबोली फेम सचित पाटीलची निर्माता म्हणून नवी इनिंग ! असंभव सिनेमाबद्दल म्हणाला..

Mangalwedha Municipal Elections: 'मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी 19 अर्ज तर नगरसेवकासाठी 160'; निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांची माहिती

SCROLL FOR NEXT