Jayant Patil 
महाराष्ट्र बातम्या

भाजपचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजप इतर राज्यांप्रमाणे येथेही आमदार पळवेल असे वाटत होतं. पण, तसे होणार नाही. भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असा गोप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांत आमच्याकडून अनेक आमदार आमच्याशी संपर्क साधत आहेत. आमच्याकडून चूक झाल्याचे सांगत आहेत. खासगीत सगळेच कबूल करत आहेत. अशा आमदारांना परत यायचे झाले तर त्याठिकाणच्या निष्ठावंतांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल. कोणतेही प्रकल्प थांबणार नाहीत, भाजपकडून जो गैरसमज पसरविण्यात येत आहे तसे काही होणार नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त प्रकल्प करू.   

किमान समान कार्यक्रमावर आमची बैठक झाली असून, वरिष्ठ नेत्यांना या बाबतचा अहवाल दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व घटकांना सामावून घेणारे यामध्ये मुद्दे आहेत. आजच यावर चर्चा करणे योग्य नाही. भाजपकडे 105 जागा आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे काही गोळा केल्या आहेत. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावे. आम्हाला पाच वर्षे सरकार टिकवायचे आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे थोडासा वेळ लागेल, असे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT