Neelam Gorhe Devendra Fadnavis Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Neelam Gorhe : सत्तेत होता, तेव्हा आरक्षण का दिलं नाही? आता फडणवीसांना खलनायक ठरवलं जातंय; नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंवर निशाणा

राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच पेटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण न्यायालयात टिकणारे असावे. आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.

पंढरपूर : राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच पेटले आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही लोकांकडून जाणूनबुजून खलनायक ठरवलं जातंय, अशी खंत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केली.

उपसभापती गोऱ्हे काल पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली.

यावेळी गोऱ्हे म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका यापूर्वीपासूनच सर्वच पक्षांचे नेते मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना विधानसभेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीचा ठराव मांडला होता. त्यांनीच पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले, पण ते न्यायालयात विरोधी पक्षातील लोकांना टिकवता आले नाही.

ज्यावेळी मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले, त्यावेळी ते नायक होते. आज परिस्थिती बदलली की काही लोक त्यांना खलनायक ठरवतात, हे कसे असू शकते. एका व्यक्तीला दोन-दोन भूमिका करता येत नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोष देणं चुकीचं असल्याचेही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारच्या चौकटीमध्ये राहून राज्य सरकारला तोडगा काढावा लागतो. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण महत्त्वाचे आहे. दुसऱ्या कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना मागवाव्यात. जरांगे- पाटील यांचे उपोषण सुटावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यावेळी शिवसेनेचे अनिल सावंत, तालुकाप्रमुख शिवाजी बाबर, जिल्हाध्यक्ष चरण चवरे आदी उपस्थित होते.

दोनशे दिवस सत्तेत होता तेव्हा आरक्षण का दिले नाही?

मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण न्यायालयात टिकणारे असावे. आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. यापूर्वी सत्तेत असणारे लोक दोन दिवसात आरक्षण देऊ, असे म्हणत आहेत; पण दोनशे दिवस सत्तेत होता तेव्हा आरक्षण का दिलं नाही, असा उपरोधिक टोला नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला.

विठ्ठल मंदिर विकास आराखड्यासाठी ३२ कोटी मंजूर

राज्य शासनाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर विकासासाठी एकूण ७३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामासाठी ३२ कोटी रुपयांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. कामाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच मंदिर विकास आराखड्याचे काम सुरू होईल, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

विठ्ठल मंदिराला मूळ पुरातन रूप देण्यात येणार आहे. या कामासाठी ७३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात ३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT