10th and 12th Students exam sakal
महाराष्ट्र बातम्या

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी नाहीच! बोर्डाला शासन निर्णय मिळाला नाही; दहावी-बारावीच्या २८ लाख विद्यार्थ्यांनी भरले १८० कोटींचे शुल्क

राज्यातील पूरग्रस्त तालुक्यातील दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. पण, त्यासंबंधीचा शासन निर्णय, पूरगस्त तालुके, महसूल मंडलांची माहिती बोर्डाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अद्याप एकाही विद्यार्थ्याला शुल्क माफी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील पूरग्रस्त तालुक्यातील दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. पण, त्यासंबंधीचा शासन निर्णय, पूरगस्त तालुके, महसूल मंडलांची माहिती बोर्डाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अद्याप एकाही विद्यार्थ्याला शुल्क माफी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.

इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. त्यात दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख ३२ लाख विद्यार्थी आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ५८० रुपये तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी ६१० रुपये शुल्क भरून परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. यंदा राज्यातील २६३ तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला. त्यात सुमारे ७० लाख शेतकऱ्यांचे ६२ लाख हेक्टरवरील पिके वाया गेली.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय जाहीर केला. मात्र, पूरग्रस्त तालुके कोणते, त्या तालुक्यात परीक्षार्थी विद्यार्थी किती याची माहिती बोर्डाला प्राप्त झालेली नाही. दुसरीकडे राज्य शासनाने परीक्षा शुल्क माफीसाठी निधीही बोर्डाला दिलेला नाही. त्यामुळे परीक्षा शुल्क माफीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच आहे.

परीक्षार्थी अन्‌ परीक्षा शुल्क

  • दहावीचे विद्यार्थी

  • १६ लाख

  • जमा झालेले परीक्षा शुल्क

  • ९२.८० कोटी

  • बारावीचे विद्यार्थी

  • १४.३२ लाख

  • जमा झालेले परीक्षा शुल्क

  • ८७.३५ कोटी

परीक्षा शुल्क माफीची प्रक्रिया अशी...

नैसर्गिक आपत्तीवेळी राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याचा निर्णय घेतला जातो. त्याचा शासन निर्णय काढला जातो. शुल्क माफीसाठी लागणारा निधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिला जातो. त्यानंतर संबंधित जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती जिल्हानिहाय माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून घेतली जाते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शुल्क परत पाठविले जाते. मात्र, आता ना स्वतंत्र शासन निर्णय ना निधी मिळाला, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पैशासाठीच प्रमोद महाजनांची हत्या? प्रवीण महाजन भावाला करत होते ब्लॅकमेल'; प्रकाश महाजनांच्या दाव्यावर काय म्हणाल्या सारंगी महाजन?

Latest Marathi News Live Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Rate Today : सोन्याचे भाव घसरले! चांदीच्या भावातही मोठी घट; जाणून घ्या आजचे भाव

Prithvi Shaw : २८ चौकार, ३ षटकार! पृथ्वी शॉ याचे विक्रमी द्विशतक; रवी शास्त्री यांचा विक्रम थोडक्यात वाचला, वीरेंद्र सेहवागच्या पंक्तित जाऊन बसला

New Rules From 1st Nov : 1 नोव्हेंबेरपासून तुमच्या खिशाला कात्री; आधार कार्डपासून बँक अकाऊंटपर्यंत 'हे' 5 नियम बदलणार, एकदा बघाच

SCROLL FOR NEXT