महाराष्ट्र

मोदी सरकारचे काम आवडल्याने त्यांना पुन्हा संधी : भागवत

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मागील सरकारचे काम आवडल्याने जनतेने त्यांना आणखी एक संधी दिली असावी. यापूर्वी दिलेली काही आश्वासनं पूर्ण करता आली नाही. त्यामुळे दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी जनतेने मोदी सरकारला पुन्हा संधी दिली असावी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (रविवार) व्यक्त केले.   

नागपूर येथे आयोजित आरएसएसच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत आहेत. आरएसएसचे अनिरुद्ध देशपांडे, विदर्भ प्रांत संघचालक रामजी हरकरे आणि नागपूरचे संघचालक राजेश लोया यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित आहेत. भागवत म्हणाले, निवडणुका झाल्या, राजकीय पक्षांना निवडणुका लढवाव्याच लागतात. यामध्ये थोडी बाधा येते. पण ती पार करून पुढे जावे लागते. मागील निवडणुकीत जो पक्ष निवडून आला तो आता अधिक शक्तीनुसार यंदा निवडून आला. मागील सरकारचे काम आवडल्याने जनतेने त्यांना आणखी एक संधी दिली असावी. यापूर्वी दिलेली काही आश्वासनं पूर्ण करता आली नाही. त्यामुळे दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची संधी दिली असावी, असे मला वाटते. 

तसेच ते पुढे म्हणाले, शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करत असतो. प्रत्येक निवडणुकीत देशातील जनता काहीतरी शिकत आहे. जनता आता सुजाण झाली आहे. त्यांना आता फसवता येऊ शकत नाही. निवडणुकीत देशातील जनता एकता आणि एकात्मता लक्षात घेऊन समजूतपणा दाखवत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT