rashmi shukla 
महाराष्ट्र बातम्या

रश्मी शुक्लांनी नेमकं काय केलं? वाचा अहवालातील ताशेरे

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारची दिशाभूल करत फोन टॅपिंग केल्याचा प्रकार उघड झाला असून त्यांचे हे कृत्य अत्यंत गंभीर असून याबाबत त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, असा अहवाल अहवाल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला. राज्य सरकारच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय असलेली माहिती राजकीय कारणासाठी उघड केल्याचा ठपका शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एक महिला अधिकारी म्हणून सरकारने दाखविलेल्या सौजन्याचा देखील शुक्ला यांनी विश्वासघात केल्याचे ताशेरे या अहवालात ओढण्यात आले आहेत. सार्वजनिक सुव्यवस्थेस काही व्यक्ती धोका पोचवू शकतात असे सांगून रश्मी शुक्ला यांनी इंडियन टेलिग्राफ कायद्याच्या कलम ५(२) अन्वये काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप करण्याची परवानगी घेतली होती. 

सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका यामध्ये दहशतवादी कारवाया, दंगली घडविणे आदी कृत्यांचा समावेश होतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शुक्ला यांना टॅपिंगची परवानगी देण्यात आली होती. मात्र या परवानगीच्या आधारे त्यांनी काही व्यक्तींचे खासगी फोन टॅप केले. त्यातील संभाषणात पोलिस अधिकाऱ्यां संदर्भातील बदल्यांचाही उल्लेख होता. या संभाषणाच्या आधारे त्यांनी अहवाल तयार केला होता, तो ३१ ऑगस्ट २०२० ला मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला.

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • रश्मी शुक्लांनी दिशाभूल करून फोन टॅपिंगची परवानगी घेतली
  • शुक्लांना देण्यात आलेल्या परवानगीचा गैरवापर झाला
  • शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांसमोर दिलगिरी व्यक्त केली होती
  • शुक्लांनी त्यावेळी अहवाल मागे घेण्याची परवानगी मागितली
  • राज्य सरकारने मात्र नियमानुसार तो अहवाल शुक्लांना परत केला नाही

प्रस्तावच नव्हता
ज्या काळात शुक्ला यांनी काही व्यक्तींचे फोन टॅप केले त्या कालावधीत प्रशासन कोरोनाच्या व्यवस्थापनात गुंतले होते. त्यामुळे एकाही आयपीएस अधिकाऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव त्यावेळी विचाराधीन नव्हता. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अहवालात नमूद व्यक्तीच्या खासगी संभाषणाचा संदर्भ कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याच्या बदलीशी जोडणे शक्य नाही असे अहवालात स्पष्ट केले आहे.

.. म्हणून कारवाई नाही
एक महिला अधिकारी, त्यातच त्यांच्या पतीचे निधन झाले होते. मुलेही शिकत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. मात्र हाच अहवाल पुढे माध्यमांतून प्रसिद्ध झाल्याची बाब उघड झाली आहे. पण रश्मी शुक्ला यांनी सरकारला जो अहवाल सादर केला होता त्यामध्ये पेन ड्राईव्ह नव्हता असेही ताज्या अहवालात म्हटले आहे.

अशा झाल्या बदल्या
२५ फेब्रुवारी ते २६ जून २०२० पर्यंत तेरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. चार अपवाद वगळता इतर सर्व बदल्या ‘पोलिस आस्थापना मंडळ-१’ च्या शिफारशींनुसार करण्यात आल्या. २७ जून ते १ सप्टेंबर २०२० पर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात आल्या नाहीत. २ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर २०२० या कालावधीत एकूण १५४ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या सर्व पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसारच झाल्या होत्या. यातील १४० बदल्या शिफारशीनुसार दहा अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेत बदल सुचवून तर ४ अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश करून करण्यात आल्या होत्या.

तेव्हाच्या समितीमध्ये
पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात देखील अहवाल सादर करण्यात होता, त्यामध्ये बदल्याच्या कार्यपद्धतीचा समावेश होता. त्यासंदर्भात स्थापन झालेल्या तत्कालीन समितीमध्ये अप्पर मुख्य गृह सचिव : अध्यक्ष ( सीताराम कुंटे ), पोलिस महासंचालक : उपाध्यक्ष ( सुबोध जयस्वाल ), पोलिस आयुक्त मुंबई : सदस्य ( परमबीर सिंग ) पोलिस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक : सदस्य ( रजनीश सेठ ) यांचा समावेश होता. असेही ताज्या अहवालात नमूद केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! खडकवासला धरण ८१% भरले; कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात

Konkan Pune Highway : कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला! ताम्हिणी, भोर अन् आंबेनळी घाट बंद झाल्याने चाकरमान्यांवर मोठे संकट; शेकडो किलोमीटरचा मारावा लागणार वळसा!

Krishna River Flood : कोल्हापूर-सांगलीत मुसळधार! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती; पाहा यंदाचा पहिला 'दक्षिण द्वार सोहळा', भाविकांची अलोट गर्दी

IND vs ENG, 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचा फलंदाजी क्रमांक बदलणार, तर बिश्नोई संघातून आऊट? कशी असू शकते भारताची प्लेइंग-११

Pune Solapur Highway: २१ कोटींचा रस्ता पुन्हा उखडला! पालखीला अवघे तीन दिवस; पुणे-सोलापूर महामार्गावर खडी, खड्डे अन् अपघातांचा धोका..

SCROLL FOR NEXT