Maharashtra-Vidhansabha
Maharashtra-Vidhansabha 
महाराष्ट्र

इतिहासात प्रथमच खातेवाटप लांबणीवर

सकाळ न्यूज नेटवर्क

राज्यात शपथविधीला १३ दिवस उलटूनही सापडेना मुहूर्त
मुंबई - मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन १३ दिवस उलटले, तरी खातेवाटपाला मूहूर्त सापडला नाही. ही बाब राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे विधिमंडळातील नोंदीवरून पुढे आली आहे.

यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तातडीने मंत्रिमंडळ अस्तित्वात आले असून, खातेवाटपही तातडीने करण्यात आले होते. १९९९ मधील निवडणुकीच्या निकालानंतर सरकारचा शपथविधी दहा दिवस लांबला होता. त्याच वर्षी शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्या वेळी दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या. मात्र, तेव्हा शिवसेना-भाजप युतीत एकमेकांच्या जागा पाडापाडीचा खेळ झाल्याने युतीच्या जागा सरकार बनविण्यासाठी कमी पडत होत्या. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या प्रचंड दबावामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या सरकारमध्ये शेकाप आणि रिपब्लिकन पक्षाचाही समावेश करण्याचा निर्णय झाल्यावर जंबो मंत्रिमंडळ तयार झाले होते. त्यामुळे सरकारचा शपथविधी तीन टप्प्यांत पार पडला होता आणि खातेवाटपही लगेच करण्यात आले होते.

यंदा सरकार स्थापन करण्यास बराच उशीर झाला. मुख्यमंत्रिपदाच्या वाटपावरून शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. या प्रक्रियेला निकालानंतर जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला. विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्‍टोबरला लागला असताना, ठाकरे सरकारचा शपथविधी २८ नोव्हेंबर रोजी झाला. मात्र शपथविधीला आज १३ दिवस उलटले असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. ही घटना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे विधिमंडळातून सांगण्यात आले.

नागपूर अधिवेशन सुरू होत आहे. यापूर्वी खातेवाटप झाले नाही, तर उत्तरे कोण देईल, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अधिवेशन म्हणून सरकारची फक्‍त औपचारिकता सुरू आहे.
- देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT