Prakash Ambedkar on Aurangzeb grave says I am not alone who visit Aurangzeb tomb 
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar on Aurangzeb : औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली म्हणून होणारी दंगल थांबली; आंबेडकरांनी दिलं स्पष्टीकरण

रोहित कणसे

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाणारा मी एकटा नाही, अजून बरेच राजकीय नेते कबरीवर गेल्याचे सांगत स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजा म्हणून ५४ वर्ष औरंगजेबाने राज्य केलं आहे. त्याने सुफी परंपरा जपली आणि तशा त्याला चांगल्या आणि वाईट बाजू आहेत. चांगल्या बाजूचं गुणगाण गायलं पाहिजे वाईट बाजू सोडल्या पाहिजेत. मुस्लीमांना कडवटपणा हिंदूचा कडवटपणा उभं करणं चालंलं आहे ते थांबलं पाहिजे.

छत्रपती संभाजी राजांच्या हत्येबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी कुठल्याही व्यक्तीच्या जातीचा उल्लेख आजिबात करणार नाही. ती व्यक्ती म्हणून होती, औरंगजेबाकडे काही समाजातील माणसं होती आणि शिवाजी महाराजांकडेही तशी माणसं होती. माणसं ही माणसं म्हणून बघा त्याची जात म्हणून बघू नका.

मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली आहेत. याचं कारणं जे चुकीचा समज तयार केला जातो आहे, तसेच हिंदू-मुस्लिम दंगली करण्याचा जो बेत होता, तो मला थांबवायचा होता. माझ्या त्या प्रयत्नाला यश आलं असं मी म्हणतो आणि औरंगजेबाच्या नावाने जी दंगल होणार आहे ती थांबली आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी प्रकाश आंबेडकारांनी यांनी यापूर्वी देखील बरेच राजकीय नेते औरंगजेबाच्या कबरीवर गेले आहेत असेही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT