Agriculture-Loss
Agriculture-Loss 
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी

सकाळ वृत्तसेवा

दहा जिल्ह्यांतील रब्बी हंगामाबाबत कंपन्या उदासीन
पुणे - राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांकडून अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत. तसेच, रब्बी हंगामासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा कवचापासून वंचित राहण्याची वेळ आली.

ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दिली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. राज्यात रब्बी हंगामातील पीकविम्यासाठी कंपन्या पुढे येत, नसल्याचे चित्र आहे. केवळ २४ जिल्ह्यांमध्ये पीकविम्यासाठी कंपन्या पुढे आल्या.  

कापूस आणि मका उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम तर सोयाबीन आणि तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतीचे ८२ टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. 
राज्याने ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजने’ची २०१६ पासून अंमलबजावणी केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल पीकविमा कंपन्यांना दिला. परंतु, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही, असे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘‘रब्बी हंगामासाठी या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२० पर्यंत वाढवावी’’, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT