Agriculture-Loss 
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी

सकाळ वृत्तसेवा

दहा जिल्ह्यांतील रब्बी हंगामाबाबत कंपन्या उदासीन
पुणे - राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांकडून अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत. तसेच, रब्बी हंगामासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा कवचापासून वंचित राहण्याची वेळ आली.

ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दिली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. राज्यात रब्बी हंगामातील पीकविम्यासाठी कंपन्या पुढे येत, नसल्याचे चित्र आहे. केवळ २४ जिल्ह्यांमध्ये पीकविम्यासाठी कंपन्या पुढे आल्या.  

कापूस आणि मका उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम तर सोयाबीन आणि तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतीचे ८२ टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. 
राज्याने ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजने’ची २०१६ पासून अंमलबजावणी केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल पीकविमा कंपन्यांना दिला. परंतु, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही, असे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘‘रब्बी हंगामासाठी या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२० पर्यंत वाढवावी’’, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT