Balbharti sakal
महाराष्ट्र बातम्या

Balbharti : ...म्हणून वसंतराव नाईक यांनी केली होती बालभारतीची स्थापना

वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना २७ जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

Balbharti : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना २७ जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली होती. आज हे मंडळ बालभारती या नावाने ओळखले जाते. (Pune : Balbharti Foundation Day read why Vasantrao Naik had established balbharti read story )

१९६४ वर्षी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारांनी व्यावसायिक तत्त्वावर चालणारी स्वायत्त संस्था स्थापन करावी अशी कोठारी आयोगाने शिफारस केली होती. त्यानुसार जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली.

बालभारती स्थापण करण्यामागील उद्दिष्टे :

  • शालेय शिक्षणाच्या अभिवृद्धीसाठी एक प्रोत्साहन देणारा मार्ग

  • शालेय पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तिका, मार्गदर्शिका, विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय पुस्तिका,पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे

  • पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्याची छपाई, प्रकाशन, साठा, वितरण व विक्रीची व्यवस्था करणे

पुणे येथे मंडळाचे मुख्य कार्यालय असून मुंबई येथे नियंत्रक कार्यालय आहे.पाठ्यपुस्तकांच्या वितरणासाठी गोरेगांव (मुंबई), पनवेल, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, लातूर व अमरावती येथे प्रमुख विभागीय भांडारे सुद्धा आहे.

दैनंदिन कामकाजासाठी मंडळाचे विद्या, निर्मिती, वित्त, प्रशासन, वितरण, स्थावर, विधी व माहिती, अंतर्गत लेखापरीक्षण, संशोधन, संगणक, ग्रंथालय, किशोर असे बारा विभाग कार्यरत आहे.

बालभारतीमार्फत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या प्राथमिक ते उच्चमाध्यमिक शाळांतील पहिली ते बारावी या इयत्तांची सर्व पाठ्यपुस्तके पुरवली जातात. इयत्ता पहिली ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती बालभारती करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECP Pakistan: आता खोटं प्रतिज्ञापत्र चालणार नाही! निवडणूक आयोग नियम बदलणार; पाकिस्तानात नेत्यांची माहिती थेट तपासणार

Walur Helical Stepwell Revival: वालूरच्या ऐतिहासिक हेलिकल सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन वेगात; सेवावर्धिनी संस्थेच्या प्रयत्नांनी संवर्धनाला नवे बळ

Marathi News Live Updates : कपिल सिबल जे काही बोलत आहेत, ते काही अंतिम सत्य नाही - म्हस्के

Mumbai Local Women Coaches: मुंबई लोकलमध्ये सर्व महिला डबे एकत्र जोडण्याचा प्रस्ताव; कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी सुरक्षा, ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चाही विचार

Paithan Village Protest: आडूळ ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात १५ दिवसांत चौकशीचा अहवाल देण्याचे लेखी आश्वासन; सचिन चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

SCROLL FOR NEXT