Maratha Reservation Radhakrishna Vikhe Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Kolhapur : उद्धव ठाकरेंचा फेसबुकवरूनच कारभार, म्हणून मराठा आरक्षण रद्द झालं; विखे-पाटलांनी सांगितली हकीकत

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयापर्यंत गेले होते.

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकार काम करत आहे. तर दुसरीकडे याच समाजातील मुलांना मोठी मदत केली जात आहे.

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयापर्यंत गेले होते. मात्र, गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात आवश्‍यक कागदपत्रेही दिली नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले.

शिंदे-फडणवीस सरकार मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची (Maratha Community Reservation) जबाबदारी झटकणार नाही. तोपर्यंत सारथीसारखी संस्था उभारून मराठा समाजातील तरुणांना आर्थिक मदत केली जात असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी सांगितले.

तर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरूनच आपला कारभार केला, असल्याची टीकाही विखे-पाटील यांनी केली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विखे-पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकार काम करत आहे. तर दुसरीकडे याच समाजातील मुलांना मोठी मदत केली जात आहे.

धनगर समाजाला आरक्षणाचा अधिकार आहे. तो दिला पाहिजे. सरकार आपली जबाबदारी झटकत नाही. शेळी-मेंढी सहकारी महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपये धनगर समाजाला दिले जाणार आहेत. यामुळे धनगर समाज निश्‍चितपणे स्वयंपूर्ण होणार आहे. विद्यार्थांना शालेय दाखले देण्यात अनेक अडचणी येत आहेत. सर्व्हर डाऊनमुळे त्यांना वेळेत दाखले मिळत नाहीत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.’

राजू शेट्टींकडून अशी अपेक्षा नाही

एकनाथ शिंदे हे सर्वात अपयशी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी टीका केली. याबद्दल बोलताना विखे-पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीची विचित्र अवस्था झाली आहे. नेत्यांपासून ते खाली कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण काहीही बोलतात. त्यानंतर स्पष्टीकरण देतात. अशी ही राष्ट्रवादीची अवस्था तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

त्यामुळे अजित पवार किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात याला फार महत्त्व नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनी बदल्यांमध्ये पैसे घेतल्याचे एक उदाहरण दाखवून द्यावे. राज्यात महसूल खात्यातील बदल्या अत्यंत पारदर्शीपणे झाल्या आहेत. शेट्टी यांच्यासारख्या व्यक्तीकडून अशी मुक्ताफळे उधळली जात आहे. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

मोठी बातमी! गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांच्या पगारासाठी ‘हे’ विघ्न; सर्वांची कागदपत्रे ‘शालार्थ’वर अपलोड केल्यावरच मिळणार वेतन; वाढीव टप्पा अनुदानाचाही नाही निर्णय

SCROLL FOR NEXT