elections sakal
महाराष्ट्र बातम्या

निवडणुकांवर पावसाचे सावट! २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस

तात्या लांडगे

सोलापूर : ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ऐन पावसाळ्यात होणार आहेत. पण, २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने आणि १५ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाचा मान्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर १० ते १५ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येईल, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली. राज्यात जूनमध्ये ९ ते १७ दिवस तर जुलै-ऑगस्ट महिन्यात १२ ते ३० दिवस पाऊस होतो. सप्टेंबरमध्येही १६ ते २७ दिवस पाऊस होतो, अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाने दिली. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन महापूर येतो, अशी पावसाळ्यात स्थिती असते. तरीही, राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, ठाणे, नागपूर, सोलापूर, अकोला, नाशिक, अमरावती, उल्हास नगर अशा १४ महापालिका तर २५ जिल्हा परिषदा आणि दोन हजार ४४८ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून जून ते सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर उर्वरित नाशिक, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

१५ जूनपूर्वी राज्यात मान्सूनचे आगमन
केरळमध्ये २७ मेपर्यंत तर महाराष्ट्रात १० ते १५ जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सून काही दिवस लांबणीवर पडेल. पण सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. तरीही, मान्सून दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भात अधिक स्पष्टता येईल.
- नीता शशिधरण, हवामान शास्त्रज्ञ, आयएमडी

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, पुणे, नगर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, हिंगोली, धुळे, बुलढाणा, नागपूर व भंडारा या २१ जिल्ह्यांमध्ये मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा अधिक (१०० ते सहाशे मिलिमीटर अधिक) पाऊस झाला आहे. विशेष बाब म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात प्रत्येक महिन्यात किमान १० ते ३० दिवसांपर्यंत पाऊस पडतो, असेही कृषी विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT