raj thackeray old statement about shivsena mp sanjay raut ncp sharad-pawar goes viral
raj thackeray old statement about shivsena mp sanjay raut ncp sharad-pawar goes viral  
महाराष्ट्र

Sanjay Raut | राज ठाकरेंच संजय राऊतांच्या बाबतीतल भाकीत खरं ठरलं?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पत्रा चाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टानं आज 4 ऑगस्टपर्यंत अर्थात चार दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. या प्रकरणात संजय राऊत चांगलेच आडचणीत सापडतान दिसत आहेत. आता राऊत यांना ईडीच्या कोठडीत रहावं लागणार आहे. ईडीनं रविवारी राऊतांच्या घरी छापेमारी करत तब्बल ९ तास संजय राऊत यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली. राऊतांवरील या कारवाईनंतर राज ठाकरे यांचा काही महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राज ठाकरे यांनी वर्तवलेले भाकित खरं ठरणार का अशी चर्चा रंगली आहे.

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊतांना ईडीने अटक केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. या चर्चांदरम्यान राज ठाकरे यांच्या दोन वक्तव्यांची देखील चर्चा केली जात आहे. राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी दिवा शहरात आले असताना पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविषयी एक प्रतिक्रिया दिली होती.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, आता त्यांनी (संजय राऊत) एकांतात बोलण्याची प्रॅक्टीस करावी. संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करताना, आमचं राजकारण मिमिक्रीवर चाल नाही, अशा घोचक शब्दात राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्याला राज ठाकरे यांनी हे प्रत्युत्तर दिलं होतं.

तसेच पुढे एका सभेत बोलताना मनले अध्यक्ष राज ठाकरे असेही म्हणाले होते की, सध्या शरद पवारसाहेब संजय राऊतांवर खूश आहेत. पण कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. दरम्यान आता संजय राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर या दोन्ही विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

संजय राऊतांवर झालेल्या कारवाईबद्दल बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत हा माझा जुना मित्र आहे, त्याचा मला अभिमान आहे. त्याचा गुन्हा नसतानाही त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचं मरण आलं तरी शरण जाणार नाही हे त्यांचं वाक्य मला खूप आवडतं, असे म्हटले आहे.

राऊत शरण देखील जाऊ शकत होते, पण ते गेले नाहीत कारण ते एकनिष्ठ आहेत. त्याचबरोबर जे माझ्यासोबत आहेत ते दमदार आहेत आणि जे तिकडे गेले आहेत त्यांना तिकडे फक्त सत्तेचा फेस शिल्लक राहिल्यावर समजेल असं ठाकरे म्हणाले. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत पण ते होऊ शकत नाही, देशातील राजकारण आता घृणास्पद होऊ लागलं आहे. तुम्हाला शिवसेना संपवायची असेल तर जनतेत जाऊन संपवून दाखवा असं आव्हान ठाकरेंनी दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT