raju shetti electricity agitation Esakal
महाराष्ट्र बातम्या

राजू शेट्टींच्या महावितरण विरोधातील आंदोलनाच्या 12 व्या दिवशी 'मुंडण'

सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही-राजू शेट्टी

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: गेल्या १२ दिवसापासून कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari sanghatana) माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी राजू शेट्टी ठाम आहेत. आज १२ वा दिवस असूनही सरकारने दखल घेतली नाही. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून १२ व्याचा सर्व विधी करून शासनाच्या नावाने बोंब ठोकली. यावेळी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, शासनाला शेतकऱ्यांच काहीही घेणं देणं राहिलेलं नाही त्यामुळे अस दुर्लक्ष करत आहे. मात्र आम्ही शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काल राज्यभर चक्काजाम केला, निर्णय न झाल्याने एका तरूण शेतकऱ्याचा हाकनाक जीव गेला, आज १२ व्याचे सर्व विधी केले. निर्णय नाही झाला तर आंदोलन अजून तीव्र होईल असेही शेट्टी म्हणाले.

कार्यकर्त्यांनी मुंडण करून १२ व्याचा सर्व विधी करून शासनाच्या नावाने बोंब ठोकली. यावेळी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

दरम्यान आज भाजपचे अतुल भातळरक (Atul Bhatkhalkar) यांनीही ठाकरे सरकाकवर निशाणा साधला. वीज तोडणीमुळे पंढरपुरात एका शेतकऱ्याने व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली. महाविकास आघाडी सरकार दाऊद इब्राहिमचे समर्थन करतात पण शेतकऱ्यांकडे बघायलाही यांना वेळ नाही. हे कुचकामी मुख्यमंत्री आणि भ्रष्टाचारी सरकारचे पाप आहे असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT