raju shetty esakal
महाराष्ट्र बातम्या

कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला लकवा मारलाय का?, राजू शेट्टी संतापले

१५ फेब्रुवारीपासून महावितरण कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच

सकाळ डिजिटल टीम

१५ फेब्रुवारीपासून महावितरण कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच

मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) स्वत: मैदानात उतरले आहेत. १५ फेब्रुवारीपासून महावितरण (MahaVitaran) कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच आहे. मात्र सरकार यावर कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने त्यांनी सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. एक ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Govt.) हल्लाबोल केला आहे.

ते म्हणतात, तेलंगणा शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज देते. कर्नाटक (Karanatka) दिवसा ७ तास मोफत वीज देते. राजस्थानने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला आहे, मग कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय काय?, असा संतप्त सवाल त्यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.

दरम्यान, दहा दिवस वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राज्यसरकारला जाग यावी यासाठी राजू शेट्टी यांनी या काळात राज्यभर रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेधही केला आहे. त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या संदर्भातील वक्तव्यांचाही खरपूस समाचार घेतला आहे. आता यानंतर त्यांच्या मागण्यांवर महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT