danve danve
महाराष्ट्र बातम्या

एकमेकांच्या पायात पाय घालून राज्य सरकार पडेल- रावसाहेब दानवे

राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोरोनाकाळात केंद्र सरकारने चांगले काम केल्याचे सांगितले आहे

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: जे काम राज्य सरकारकडून होत नाही त्याचं खापर केंद्र सरकारवर फोडण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याचे वक्तव्य भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केले आहे. तसेच एकमेकांच्या पायात पाय घालून हे सरकार पडेल असंही मंत्री दानवे म्हणाले.

मागील ७ वर्षात मोदी सरकारचं काम चांगलं असून वेगवेगळ्या क्षेत्रात देशात प्रगती होत आहे. या काळात भारताचे इतर देशांशी असणारे संबंध सुधारले आहेत. तसेच कोरोना काळातील परिस्थितीही केंद्र सरकारने व्यवस्थित हाताळली आहे. तसेच आर्थिक क्षेत्रातही देशाने सर्वोत्तम काम केल्याने भारतीय जनता केंद्र सरकारच्या कामावर खूश असल्याचेही मंत्री दानवे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सांगितले.

पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, महाविकास आघाडीमुळे मराठा समजाला आरक्षण गमवावं लागलं. राज्यातील सरकार पाडण्याची इच्छा नाही पण राज्यातील जनता महाविकास आघाडीवर नाराज आहे. कोरोनाकाळात केंद्र सरकारने राज्य सरकारला भरपूर मदत केली आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत देशात कोरोना रुग्ण कमी आहे. केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती योग्य हाताळली आहे. इतर देशांची लोकसंख्या आणि तिथला प्रसार पाहता भारताने कोरोनाची परिस्थिती चांगली आटोक्यात आणली असल्याचेही रावसाहेब दानवे म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT