Ravi Rana e sakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विसरले, पण आम्ही... : रवी राणा

'हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावं'

सकाळ डिजिटल टीम

'हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावं'

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी हनुमान चालिसा वाचावी असं आम्हाला वाटतं. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावं. बाळासाहेब ठाकरेंवर श्रद्धा असेल तर तुम्ही पठण कराल. शिवसेना हिंदूत्वाची दिशा सोडून दुसऱ्या दिशेने जात आहे, असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे. महाराष्ट्राला साडेसाती लागली आहे, म्हणून हनुमान चालीसा पठण करा, असा सल्ला आम्ही दिला आहे. मात्र हिंदुत्वाची मतं घेऊन ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आता विसर पडलाय, अशी टीका भाजपाचे रवी राणा यांनी केला आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी हनुमान जयंती दिनी पठण करावे अशी विनंती केली होती. बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे मातोश्रीवर हनुमान चाळीसा वाचन करावे अशी आमची इच्छा आहे. जे हनुमान चाळीसाला विरोध करतात ते बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक नाहीत. उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. त्यांनी विघ्न संपविण्यासाठी हनुमान चाळीसा वाचली पाहिजे, असा सल्लाही यावेळी रवी राणा यांनी दिला आहे. काहीही झाले तरी आम्ही मात्र उद्या आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चाळीसा वाचणार, असा ठाम निर्णय रवी राणा यांनी दाखवला.

पुढे ते म्हणाले, आम्हाला पोलिसांनी नोटीस दिली आहे. आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाही. महाराष्ट्रावर जे संकट आलं आहे ते दूर व्हावं यासाठी आम्ही हनुमान चाळीसा मातोश्रीवर वाचणार आहोत. उद्धव ठाकरे यांना सत्तेचा लोभ आला असून त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. आमचा यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. त्यामुळे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेही राखू शकत नाही असेही आमदार राणा म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT