revenue areas names continued to be Aurangabad and Osmanabad not chhatrapati sambhajinagar and dharashiv  sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai High Court : औरंगाबाद अन् उस्मानाबाद नामांतर प्रकरणात मोठी अपडेट! दोन्ही जिल्ह्यांची नावे तीच राहणार

रोहित कणसे

राज्यातील दोन शहरे औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराचा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राज्य सरकारने या दोन शहरांची नावे छत्रपची संभाजीनगर आणि धारशिव करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला विरोध देखील झाला. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे महसूल क्षेत्र (जिल्हा आणि तालुका पातळीवर) औरंगाबाद आणी उस्मानाबाद हीच नावे राहणार आहेत. मुंबई हायकोर्टाने याबद्दलचा निर्णय जाहीर केला आहे.

न्यायालयात औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर फक्त शहरापुरतं झालं होतं. जिल्हा आणि तालुका पातळीवर कोणताही बदल झाला नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे आव्हान देणाऱ्या याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. याचिकांच्या वैधतेवर सरकारने जोरदार आक्षेप नोंदवला होता. यानंतर महसूल आणि जिल्हा पातळीवरच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढल्या.

जेव्हा शासन आदेश निघेल त्यावेळी याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. तसेच तूर्तास तालुका आणि जिल्हा पातळीवर नवीन नावे वापरणार नाही अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयात हमी दिली आहे. आता औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिकांवर ४ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT