सोलापूर : पाण्याचा अपव्यय होणार नाही याची खबरदारी घेत तत्कालीन राज्य सरकारने शेतकऱ्यांना ठिबकसाठी 80 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. ठिबक अनुदानात 60 टक्के केंद्र सरकार तर राज्य सरकारचा 40 टक्के हिस्सा आहे. 2019-20 मधील अर्जदार अडीचलाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये 180 कोटी तर जानेवारीत 120 कोटी दिले. मात्र, जानेवारीत केंद्राने एक लाख शेतकऱ्यांच्या ठिबक अनुदानासाठी दिलेले 120 कोटी राज्य सरकारने दुसरीकडेच खर्च केल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यातील अवर्षणप्रवण 149 तालुके, आत्महत्याग्रस्त अमरावती व औरंगाबाद महसूल मंडळातील सर्वच जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा असे 14 जिल्हे आणि चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या नक्षलीग्रस्त जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना तत्कालीन सरकारने सुरु केली. त्यानुसार तेथील शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनासाठी 80 टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला. ठिकब व तुषार सिंचनासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के तर इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्टरपर्यंत) 75 टक्के अनुदान दिले जाते. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत मोका तपासणी करुन जिओ टॅगिंग करणे बंधनकारक असून त्यानंतर पुढील 15 दिवसांत आरटीजीएसद्वारे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करणे अपेक्षित आहे. मात्र, अर्ज करुन वर्ष संपले तरीही पूर्ण रकमेत अनुदान मिळालेले नाही. दोन टप्प्यात अनुदान दिले जात असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.
ठळक बाबी...
एप्रिलमध्ये अनुदान मागणी करुनही उत्तर नाही
ठिबक अनुदानासाठी पात्र ठरलेल्या राज्यातील सुमारे सव्वालाख शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे लॉकडाउन काळातही अनेक शेतकरी कृषी विभागाशी संपर्क करुन अनुदानाची विचारणा करीत आहेत. तर अनेकजण कृषी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मिळालेले 120 कोटी आणि राज्य सरकारचा हिस्सा 80 कोटी, असे एकूण 200 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी कृषी विभागाने एप्रिलमध्ये केली. त्यानंतर आता स्मरणपत्रही पाठविले आहे. मात्र, सरकारकडून काहीच उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागेल, असेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.