msrtc strike
msrtc strike esakal
महाराष्ट्र

ST संपामुळे ग्रामीण प्रवासी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल: हायकोर्ट

विनायक होगाडे

मुंबई: एसटी संपावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. हायकोर्टाने पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होईल असं सांगितलं आहे. कोर्टाने संपावर तोडगा काढण्याचे आदेश समिती आणि संघटनेला दिले आहेत. या संपामुळे ग्रामीण प्रवासी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, त्यामुळे त्वरित यावर तोडगा काढण्यात यावा असं कोर्टाने सांगितलं आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत न्यायालयाने खंत व्यक्त केली आहे.

दुसरीकडे आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. तब्बल तीन तास ही बैठक चालली. या बैठकीमध्ये परब यांची एसटी संपासंदर्भात शरद पवारांशी चर्चा झाली. ही बैठक झाल्यानंतर बोलताना अनिल परब यांनी म्हटलंय की, संपामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे या संपावर काय तोडगा काढता येईल, यासंदर्भात शरद पवारांशी आणि अधिकाऱ्यांशी तीन तास बैठक चालली.

अनिल परब म्हणाले की, गेले काही दिवस एसटीचा संप सुरु आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यासंदर्भातच शरद पवारांनी मला आणि अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली. या संपावर काय तोडगा निघू शकतो, याबाबत त्यांनी तपासणी केली. संप मिटवण्यासाठी महामंडळाची आर्थिक परिस्थिती आणि संपकरी कामगारांच्या मागण्या यासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली. सखोल चर्चा झाली आणि वेगवेगळे पर्याय कशापद्धतीने तयार करता येतील आणि मार्ग काढता येईल, यावर चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT