राज्यात शहराच्या नामांतरानंतर औरंगाबाद शहराचं नान‘संभाजीनगर’ करण्यावरून काही दिवसांपासून राजकारण केलं जात आहे. यादरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी खळबळजनक विधान केलं. औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता, त्याचा खरा इतिहास जेव्हा समोर येईल तेव्हा हिंदू समाजही ते मान्य करेल, असं विधान त्यांनी केलं, यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार टीका केली आहे.
संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी "औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही." असे म्हटले आहे. यासोबतच शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी अबू आझमी महाराष्ट्रात का राहतायत? असा सवाल देखील केला आहे. अशा व्यक्तीला सर्वात आधी महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
अबू आझमी काय म्हणाले होते?
औरंगजेब बादशाह वाईट माणूस नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. जर त्यांचा खरा इतिहास समोर आला तर हिंदू नाराज होणार नाहीत. देशभरात अनेकांची नाव औरंगजेब आहेत. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावं मुस्लीम व्यक्तीच्या नावावरुन आहेत. या जिल्ह्यांची नाव बदलल्यानं कोणाला नोकऱ्या मिळणार नाहीत. महागाई कमी होणार नाही. जर ही नाव बदलून तरुणांना नोकऱ्या मिळणार असतील तर मी या बदलाचं स्वागत करेन, आझमी म्हणाले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.