Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

'समृद्धी महामार्गामुळं विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील'

सकाळ डिजिटल टीम

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी लोकार्पण होणार आहे.

समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. विदर्भातील शेतकऱ्यांच्या (Vidarbha Farmers) आत्महत्या या महामार्गामुळं कमी होतील. शेतकऱ्यांना या महामार्गाचा फायदा होईल, असा दावा एमएसआरडीसीचे अध्यक्ष आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केलाय. सध्या मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी १८ ते २० तास लागतात. समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, त्यावेळी मुंबई-नागपूर (Mumbai-Nagpur) हे अंतर आठ तासांमध्ये गाठता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांसह समृद्धी महामार्गाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदेंनी ‘सकाळ’शी संवाद साधला. कोरोना काळात महामार्गाचे काम मार्गी लावले. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव दिल्याचं समाधान असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

महामार्गामुळं वेळ आणि इंधनाची बचत होईलच. याशिवाय हा मार्ग पर्यावरणपूरक असेल. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यावर प्रक्रिया होईल. या भागात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यावर आधारित उद्योगधंदेही येतील. या सर्व गोष्टींचा फायदा शेवटी शेतकऱ्यांनाच होईल आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असा दावाही एकनाथ शिंदेंनी केलाय.

नियमांचं पालन करुन वाहन चालवल्यास अपघात होणार नाहीत

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात होतात, त्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्या उपाययोजना आहेत? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग अपघातमुक्त असेल. यासाठी महामार्गावर विशेष प्रणाली असेल. नियमांचे पालन करुन वाहन चालवल्यास अपघात होणार नाही. मी स्वत: या महामार्गावर गाडी चालवलीये. हा चांगला अनुभव होता. १२० च्या पुढं गाडी चालवली तरी काही अडथळे आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Bhayandar accident : भाईंदर खाडी परिसरात 'चंदीगड एक्सप्रेस'मधून प्रवासी पडला; रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणार!

India SIR Schedule: बिहारनंतर देशातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, जाणून घ्या 'या' राज्यांची नावे

'मुंबई पुणे मुंबई 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेची केमिस्टी पुन्हा पहायला मिळणार, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : घाटकोपर रेल्वे स्थानक नजीक असलेल्या इमारतीला आग

SCROLL FOR NEXT