bjp, Shivsena 
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांचे स्वप्न असलेल्या समृद्धी महामार्गाला आता बाळासाहेबांचे नाव?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तर, भाजपने आधीच दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच नाव देण्याची घोषणा केली होती. 

समृद्धी महामार्गाला आधी शिवसेनेने जोरदार विरोध केला होता. नाव देण्यावरून सत्तेत असलेल्या सेना- भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाले होते. अखेर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचच नाव देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने फडणवीस यांच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिलेली आहे. मात्र, समृद्धी महामार्गाविषयी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. आता या मार्गाच्या नावावरून शिवसेना आपल्या मतावर ठाम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर CSK च्या ताफ्यात! काल वानखेडेवर होता, आज मोठा ट्विस्ट; रोहितचा आशीर्वाद घेतला अन्...

Latest Marathi News Live Update : इंडिया आघाडीने महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला: अमित शहा

Lucky Plants for Home : कुंडीत लावा 'ही' 2 युनिक झाडे! घराकडे खेचतात पैसा; उघडतात यशाची दारे, पण रोपटं लावताना करू नका एक चूक

Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

IPL 2026 News: "हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवा... रोहित शर्माकडे Mumbai Indians चं नेतृत्व पुन्हा सोपवा"

SCROLL FOR NEXT